पुणे- मातंग एकता आंदोलनच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ऍड राजश्रीताई अडसूळ यांची निवड करण्यात आली. मातंग एकता आंदोलनच्या राज्यव्यापी संघटनेच्या निर्धार बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांची निवड केली.
या प्रसंगी ऍड राजश्रीताई अडसूळ यांना रमेश बागवे यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. यावेळी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे, समन्वयक विठ्ठलराव थोरात, जनरल सेक्रेटरी अरुण गायकवाड, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“राज्यात दिवसें दिवस मागासवर्गीय महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून,या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी, संघटनेच्या महिला भगिनींची एक सक्षम फळी निर्माण करण्यासाठी अॅड राजश्री ताई अडसूळ आपण पुढाकार घ्यावा” असे आवाहन रमेश बागवे यांनी केले.