संकष्टी चतुर्थी विशेष : आज संकष्टी चतुर्थी आहे श्री गणेश भक्त 5 मनोभावे उपवास आणि पूजा करतात असे मानले जाते की आजच्या दिवशी अर्थात महिन्यातून येणाऱ्या दोन चतुर्थी जो भक्त मनोभावे उपवास करून व्रतवैकल्य करून मनोभावे पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कोणत्याही कामांमध्ये येणारे अडसर दूर होण्यासाठी गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो.
तर आज दिवसभरामध्ये केव्हाही मनोभावे श्री गणेशा समोर आपल्या मनातली इच्छा नक्की बोला… श्री गणेश ही देवता विघ्नहर्ता आहे. कोणतेही काम करताना हातातोंडाशी आले की काम बिघडते ,कोणतेही काम सहजासहजी पूर्ण होत नाही ,किंवा कोणतेही काम मनासारखे होत नाही, अशी कोणतीही संकट जर तुम्हाला येत असतील तर या विघ्नहर्त्याची चतुर्थीची उपासना आवश्यक करा.
चतुर्थीच्या दिवशी चतुर्भुज होऊन स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील श्री गणेशाला पूजून लाल फुल अवश्य अर्पण करावेत. घरामध्ये गणपती अथर्वशीर्ष रोज म्हटल्याने किंवा ऐकल्याने घरातील वातावरण शांत आणि निर्मळ राहते. मनावरील ताण देखील कमी होतो. आपल्या पाठीशी श्री गणेशाचा आशीर्वाद आहे अशी अनुभूती होते.
रोज अगदी काम करताना गणपती अथर्वशीर्ष ऐकले तरीही चालेल. चतुर्थीच्या दिवशी स्वतः गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. घरातील गणपती समोर किंवा गणपती मंदिरामध्ये विड्याचे पान आणि सुपारी ठेवावी. त्यासह जमतील तसे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. श्री गणेशाला उकडीचे मोदक आवडतात असे मानले जाते.
लक्षात ठेवा कोणत्याही देवाची पूजा ही मनाला एक शक्ती मिळवून देत असते. घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर मंदिरात तेवणारा दिवा आणि उदबत्तीच्या सुवासाने घराला एक प्रकारचे निर्मळ वातावरण प्राप्त होते. त्यामुळे घरातील व्यक्ती शांत आणि समजूतदार होते. आजच्या दिवशी श्री गणेश सर्व भक्तांवर आपली कृपा करून सर्व विघ्न दूर करो अशीच प्रार्थना…!