मुंबई : हिंदू धर्मात तुळशीला (Basil Effect) अनन्यसाधारण महत्व आहे. घरामध्ये तुळशीचे (Basil Effect) रोप लावून त्याची पूजा केल्याने आपल्याला अनेक फायदे होतात. तुळशीच्या उपायांमध्ये भाग्य बदलण्याची क्षमता असते. याच तुळशीच्या रोपामुळे तुमचे दारिद्रयदेखील दूर होऊ शकते. ज्योतिषांच्या मते हे उपाय केल्याने धनाची कमतरता दूर होऊन समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा हे उपाय
आर्थिक समस्यांमध्ये तुळशीचे उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. शास्त्रानुसार ज्यांच्या घरात धनाची कमतरता आहे, पैसा अजिबात येत नाही, शत्रूत्व आहे, खूप तणाव आहे, त्यांनी तुळशीचा हा उपाय करावा. त्यासाठी तुळशीच्या रोपावर पाण्याऐवजी उसाचा रस अर्पण करावा. अंजीरात उसाचा रस घेऊन तुळशीच्या मुळापाशी सात वेळा नामस्मरण करून सोडावे. यामुळे संपत्तीमध्ये वाढ होईल. कसलीही चणचण भासणार नाही. तीन वर्षांत याचा परिणाम तुम्हाला दिसेल.
आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीच्या (Basil Effect) मुळास जल अर्पण करावे. यासोबतच सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणे फायदेशीर ठरू शकते. गळ्यात तुळशीचे माळ धारण केल्यानेदेखील तुम्हाला याचा फायदा होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. TOP NEWS मराठी याबाबत कोणतीही हमी देत नाही)