मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र आता राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ड्रामा क्विन राखी सावंत विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलाला आर्यन खानला अटक केल्यानंतर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. समीर वानखेडे आणि राखी सावंत यांच्यातील वाद नेमका काय आहे चला पाहुयात…
काय लिहिले याचिकेमध्ये?
राखी सावंतच्या विरोधात समीर वानखेडे यांनी कोर्टात 11 लाखांच्या मानहानीचा दावा केला आहे. अभिनेत्री, ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचे वकील अली कासिफ खान विरोधात समीर वानखेडे यांनी मानहानीचा दावा केला आहे. समीर यांनी याचिका दाखल केली असून राखी आणि कासिफ यांनी आपली बदनामी करुन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचे या याचिकेमध्ये म्हंटले आहे.
मुंबईतील दिंडोशी शहर दिवानी न्यायालयात समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि तिचे वकील कासिफ यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.यामुळे आता राखी सावंतच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला
Sunil Mane : सुनील माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश
Nitesh Karale Guruji : नितेश कराळे गुरुजी शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभेची निवडणूक लढवणार?
Nitin Gadkari : “… तर मी कधीच राजकारणात आलो नसतो”; नितीन गडकरींनी सांगितली ‘ती’ आठवण
Pune Crime News : पुण्यात छेडछाडीला वैतागून एका 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या