नाशिक : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी पाटील महाराष्ट्राच्या गावागावात पोहोचली आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. काही दिवसांपूर्वी अशाच एका कार्यक्रमादरम्यान छत कोसळून 10 ते 20 जण जखमी झाले होते. ही घटना ताजी असताना आता नाशिकमधील कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांकडून पत्रकारांना मारहाण (Beating journalists) करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांनी मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम (Thackar Dome0 येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी काही हुल्लडबाज तरुणांनी उपस्थित पत्रकारांचे पाय ओढण्यास सुरवात केली. त्यामुळे दोन्ही पत्रकारांना व्यासपीठावरून पाय धरून खाली ओढण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच काही तरुणांनी या दोघांना मारहाणदेखील केली. यामध्ये कॅमेऱ्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज (Lathicharge) केला.