मुंबई : मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यामध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती (Sikander Bharti) यांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र त्यांच्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.
दिग्दर्शक सिकंदर भारती यांच्या पार्थिवावर 25 मे रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सिकंदर भारती यांच्या पश्चात पत्नी पिंकी आणि तीन मुले सिपिका, युविका आणि सॉक्रेटिस असा परिवार आहे.
सिकंदर भारती यांची कारकीर्द
सिकंदर भारती यांनी आजवर बॉलिवूडमध्ये ‘घर का चिराग’, ‘जालीम’, ‘दस करोड रुपये’, ‘भाई भाई’, ‘सैनिक सर उठा के जियो’, ‘दंडनायक’, ‘रंगीला राजा’, ‘पोलिस वाला’ आणि ‘दो फंटूश’ या सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सिकंदर भारती यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी
Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा
Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव
Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी
Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक