बोधकथा : स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२, नरेंद्रनाथ दत्त) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले.
विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. “माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो…”, या शब्दांनी सुरू झालेल्या त्यांच्या भाषणासाठी ते फार प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये त्यांनी १८९३ मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला.
उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३ ला विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली.. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई . त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
नरेंद्रनाथांनीडेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते.
१८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, “नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.” त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.
शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.
बोधकथा
एकदा स्वामी विवेकानंद त्यांच्या आश्रमात झोपले होते. तेव्हाच एक व्यक्ती त्यांच्याकडे आली जी अत्यंत दु:खी होऊन स्वामी विवेकानंदांच्या पाया पडली आणि म्हणाली, महाराज, मी माझ्या आयुष्यात खूप कष्ट करतो, मी सर्व काही मनापासून करतो, तरीही आजपर्यंत मी कधीही यशस्वी व्यक्ती होऊ शकलेलो नाही. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून स्वामी विवेकानंद म्हणाले, “ठीक आहे. जोपर्यंत तू माझ्या या पाळीव कुत्र्याला थोडा वेळ घेऊन येत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या समस्येवर उपाय शोधून काढेन. असं बोलून तो माणूस कुत्र्याला फिरवायला गेला. आणि मग काही वेळाने ती व्यक्ती परत आली. हा कुत्रा इतका का धापा टाकतोय ? असा प्रश्न स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला विचारला. तुम्ही मात्र थोडेही थकलेले दिसत नाही, असे काय झाले?
यावर त्या व्यक्तीने सांगितले , मी सरळ माझ्या वाटेने चालत पण हा कुत्रा इकडे तिकडे धावत राहिला आणि काही दिसल्यास तेथे तो धावला. ज्यामुळे तो खूप थकला आहे. स्वामी विवेकानंद हसून म्हणाले, “हेच तुमच्या प्रश्नांचं उत्तर आहे.” आपल्या यशाचे गंतव्यस्थान आपल्यासमोर आहे. पण तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानाऐवजी इकडेतिकडे धावत असता, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. हे ऐकून त्या व्यक्तीला समजलं. जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपल्या गंतव्यस्थानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कथेतून काय शिकलो ?
स्वामी विवेकानंदांची ही कथा आपल्याला काय करावे लागेल हे शिकवते. जे काही बनायचं आहे ते. आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि इतरांना पाहून आपणही तेच करतो. ज्यामुळे आपण आपल्या यशाच्या ध्येयाच्या जवळ असताना दूर भटकतो. म्हणूनच आयुष्यात यशस्वी व्हावं लागतं! म्हणून आपण नेहमीच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे !