नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर (Onion Export) बंदी आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, आता 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम
31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे परित्रक सरकारच्या वतीन काढण्यात आलं आहे. पुढील आदेश निघपर्यंत कांद्यावरील निर्यातबंदी कायम राहणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी केली होती. ती 31 मार्चला उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, केंद्र सरकारनं पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Lok Sabha Elections : ठरलं! शिवाजीराव आढळराव पाटील ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची शिवसृष्टीला भेट
Mahayuti Seat Sharing : ‘या’ 4 जागांमुळे भाजपची डोकेदुखी वाढली; अजूनही तोडगा निघेना
Lok Sabha Elections : महायुतीमध्ये मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ