नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा विषय पेटला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत थेट नेहरुंचे नाव घेत आरक्षाबाबत मोठे वक्तव्य केले. नेहरुंचा आरक्षणाला विरोध होता असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी यावेळी केले. एवढेच नाहीतर त्यांनी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्रदेखील राज्यसभेत वाचून दाखवले. यादरम्यान या पत्रावरुन राज्यसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला.
आरक्षणाबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी?
काँग्रेस सध्या जातीपातीवरुन भाष्य करत आहे. दलित, मागास आणि आदिवासी यांच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसला विरोध आहे. जर बाबासाहेब नसते तर SAC/ST ला आरक्षण मिळाले असते की नसते याचा मी विचार करत आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मला आरक्षण आवडत नाही आणि विशेषतः नोकरीत आरक्षण नकोच असा उल्लेख नेहरुंनी या पत्रात केला होता असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rajkot Stadium : राजकोट स्टेडियमला ‘शाह’ यांचं नाव देण्यात येणार; ‘या’ दिवशी पार पडणार सोहळा
Sanjay Raut : संजय राऊतांनी शिंदे-पवारांना दिले थेट चॅलेंज! म्हणाले ‘हिंमत असेल तर…’
Nashik News: मुंबई-आग्रा महामार्गांवर बर्निंग ट्रकचा थरार
Pune Crime News : प्रेमप्रकरण जीवावर बेतलं ! पुण्यातील ‘त्या’ हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीमध्ये हत्या