जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने (Indian Army) मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी ज्या ठिकाणी लपून बसले होते ते घर रॉके़ट लाँचरने उडवलं आहे. लष्कराच्या या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले आहेत. कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्त कारवाई करत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस, लष्कराच्या 34 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवाद्यांनी आपल्याला घेराव घातल्याचं लक्षात येताच गोळीबार सुरु केला होता. यानंतर भारतीय जवानांनी देखील गोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर दिले.
ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लाँच कमांडर बशीर अहमद मलिक आणि अहमद गनी शेख अशी पटली आहे. बशीरने नियंत्रण रेषेजवळ अनेक दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत केली होती. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सापडला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.