नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतासह जगभरातच नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोबाईल फोनबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये आपत्कालीन अलर्ट (Disaster Alert) फीचर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालीन अलर्ट फीचर (Disaster Alert) देण्याचं अनिवार्य केलं आहे. इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. पण भारतात विकल्या जाणार्या अनेक स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाहीये. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हे आदेश दिले आहेत. दुसरीकडे इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन कंपन्यांनी दिले आहे. पण भारतात विकल्या जाणार्या स्मार्टफोनमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर उपलब्ध नाही.
का घेण्यात आला हा निर्णय?
सध्या भारतासह जगभरात नैसर्गित आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. बघता बघता पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं तुर्कीमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. कुणी कल्पनाही केली नसेल इतकं मोठं हे संकट आले होते. हे संकट कधी आणि कुठेही येऊ शकते. जगभरात भूकंपाच्या वाढत्या घटना पाहता सरकार अलर्ट झाले आहे.
माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल
या फीचरचा काय होणार फायदा?
फोनमध्ये हे अलर्ट फीचर (Disaster Alert) पाहता यूजर्सला भूकंपाची सूचना अगोदरच देण्यात येणार आहे. या अलर्ट फीचरमुळे यूजर्सला भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी या सारख्या नैसर्गित आपत्तींची पूर्वसूचना देण्यात येणार आहे.मोबाईलमध्ये हे नवे फीचर आल्यानंतर सरकारद्वारे नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देण्यात येणार आहे.पूर, भूकंप, त्सुनामी यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. यामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्यापासून देशाचा बचाव केला जाऊ शकतो.