नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यांच्यासोबत केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांनासुद्धा शपथ दिली गेली. दरम्यान, आता मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाआधीच मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून खासदार गोपी सुरेश यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली आणि आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे.
कोण आहेत सुरेश गोपी?
सुरेश गोपी हे केरळमधील भाजपचे एकमेव खासदार आहेत.सीपीआईचे उमेदवार वी.एस. सुनीलकुमार यांचा सुरेश गोपी यांनी 74 हजार 686 मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. एक्शन हिरो असलेल्या गोपी यांनी भाजपच्या तिकिटावर त्रिशूरमध्ये मोठा विजय मिळवत केरळमध्ये भाजपसाठी इतिहास घडवला होता.
केरळमध्ये भाजप दशकांपासून खातं उघडण्यासाठी संघर्ष करत आहे. शेवटी सुरेश गोपी यांच्यामुळे भाजपचं केरळमध्ये खातं उघडलं. केरळमध्ये भाजपचे एकमेव खासदार असलेल्या सुरेश गोपी त्यांचे अर्धवट चित्रपट पूर्ण करायचे आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्याला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं म्हटलंय. रविवारीच त्यांनी केंद्रीय राज्य मंत्री म्हणून शपथ घेतली होती. लोकसभेत विजय मिळवण्याआधी 2016 मध्ये ते राज्यसभा खासदार होते. 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर
Monsoon Update : पुढील 24 तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज