नवी मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. दरम्यान देशभरातील 11 जोडप्यांना या महापुजेचा मान मिळाला आहे. या 11 दाम्पत्यांमध्ये नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावं आहेत. आता हे दाम्पत्य नेमके कोण आहे? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया….
विठ्ठल कांबळे हे कारसेवक होते, त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. विठ्ठल कांबळे हे पेशानं शिक्षक आहेत. तसेच ते आरएसएसचे रायगड जिल्हा सेक्रेटरी देखील आहेत.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील महत्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची जबाबदारी विठ्ठल कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
मात्र त्यांनाच निमंत्रण येईल आणि ते देखील थेट रामलल्लांच्या पूजेचा मान मिळेल अशी कल्पना देखील त्यांनी केली नव्हती. त्यामुळे आयुष्याचे सार्थक झाले अशी प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांनी निमंत्रण मिळाल्यानंतर व्यक्त केली. तसेच हे सगळं अद्भुत असून आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने महाराष्ट्राची पैठणी साडी नेसून रामलल्लांच्या पूजेला बसणार असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल कांबळे यांच्या पत्नी उज्वला कांबळे यांनी दिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य
Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा
IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी
Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला
Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका
Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?
Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद
Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव