पुणे : देश पातळीवर सध्या हवामानात (Weather Update) असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना दिसत आहेत.महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा दाह आणखी वाढला असून, सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. वर्ध्यात तापमान 42.5 अंशांवर पोहोचले आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि वर्ध्यामध्ये उष्ण रात्रीचा यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. देशात सध्या मध्य प्रदेशपासून कर्नाकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, परिणामस्वरुप महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला