पुणे : ऊन पावसाचा खेळ संपूर्ण राज्यात सुरु असताना पुढचे चार दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट-
या मध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये ऑरेंन्ज अलर्ट जारी करण्यात आला असून 11 ते 15 जूनपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून राज्यात उकाडा सहन करावा लागला होता. राज्यातील काही जिल्ह्यांनी चाळीशी पार केली होती. तर सोलापूर आणि पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मात्र या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती वर्तवण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या
Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ
Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट