मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. यादरम्यान हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता आहे. याशिवाय अकोला, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन
Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला