मुंबई : राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आलं आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला हाय अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा देखील सामना करावा लागणार आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
जळगाव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मिळाला दिलासा ! दानवे, खैरेंचं अखेर झालं मनोमिलन
Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण
Pune Crime : पुण्यात देशी दारूच्या दुकानात तुफान राडा; ‘त्या’ व्यक्तीने वेधले सगळ्यांचे लक्ष