नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मिचॉंग चक्रीवादाळाचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे देशाता हळूहळू थंडी (Weather Update) वाढताना दिसत आहे. देशातील बहुतांश राज्यातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळं आता ठीक ठिकाणी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आसाम, मेघालाय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये दाट धुक्यांसह गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मात्र असे असले तरी आजही काही रांज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीप, कर्नाटकचा किनारी भाग आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिचॉंग चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला आहे, मात्र तरी देखील महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे, तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या
Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू