मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त कालावधीपासून अवकाळी पाऊस (Weather Update) हजेरी लावत आहे. यामुळे त्या भागातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट
आज सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पुण्याच्या काही भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अकोला या जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत