नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी ठाकरे गटाचे साथ सोडत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश झाला असून यासह काही नगरसेवकांचा सुद्धा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश पार पडला आहे.
ज्या व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली होती, त्याला विधान परिषद आमदाराकीचे बक्षीस दिले होते त्यानेच ठाकरे गटाला पाठ दाखवली आहे.
कोण आहेत आमश्या पाडवी?
शिवसेना उबाठाकडे एकही आदिवाशी चेहरा नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना संधी देण्यात आली होती. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवल्यामुळे बक्षीस म्हणून 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी देऊन अनेक बड्या नेत्यांना डावूलन त्यांना नंबर लावल्याने पक्षात नाराजी होती. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी दोन वेळा निवडणूक लढवली मात्र 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेत संधी दिली होती.