मुंबई : उद्या अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. देशभरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण आहे. या निमित्तानं लाखो भाविक अयध्योमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या निमित्तान राज्य सरकारकडून राज्यात सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आता कायद्याच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायालयात याचिका दाखल
रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं देण्यात आलेल्या राज्यातील सार्वजनिक सुट्टीला कायद्याच्या विद्यार्थ्यांकडून आव्हान देण्यात आले आहे. शिवांगी अग्रवाल, सच्च्यदित साळवे, वेदांत अग्रवाल, कृषी बांगिया यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काय आहे याचिकेमध्ये?
अशाप्रकारची सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्तानं देता येऊ शकते, परंतु एका धार्मिक कार्यक्रमासाठी अशा पद्धतीनं सुट्टी जाहीर करणं चुकीचं आहे. या सुट्टीमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे नुकसान होईल असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच सुट्टीकालीन खंडपीठानं यावर सुनावणी तातडीनं करावी अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा
Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात
Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान
Kangana Ranaut : ‘अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी…’, कंगणा राणावतचे वक्तव्य
Amit Shah : भारत-म्यानमार सीमेवरील मुक्तसंचार बंद; गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा
IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी
Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला
Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका
Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?
Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह