मुंबई : टोलदरवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे (Raj Thackeray) आता पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आपल्या लाव रे तो व्हिडीओच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची वक्तव्य काय केलेली, ते राज ठाकरेंनी भर पत्रकार परिषदेत मांडले. तसेच, टोलमुक्त महाराष्ट्रासाठी काय-काय आश्वासनं दिली गेली आणि त्याचं पुढे काय झालं? या सर्वाचा लेखाजोखा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडला आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
![Raj Thackeray](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2023/09/Raj-Thackeray-1024x579.jpg)