राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत अयोध्या दौरा स्थगितीबाबत सांगितलं.राज ठाकरे म्हणाले,अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्याचं म्हटलं. अनेकांना वाईट वाटलं, अनेकांना आनंद झाला. अनेकजण गुपचूप बोलू लागले. मी मुद्दाम मध्ये दोन दिवस घेतले. की काय बोलायचं ते बोलून घ्या एकदाचं. मग माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेल असं म्हटलं आहे.
ज्या दिवशी मी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यानंतर अयोध्येला जाणार असल्याच्या तारखेची घोषणा पुण्यात केली. त्यानंतर काही दिवसातच हे सर्व प्रकरण सुरू झालं. की, अयोध्येला जाणार नाही. मग ते प्रकरण सर्व वाढू लागलं. मी सर्व पाहत होतो की काय सुरू आहे.
मला मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशातून काही गोष्टींची माहिती मिळत होती की नेमकं काय चाललं आहे. एक वेळ आली आणि माझ्या लक्षात आलं की, हा एक ट्रॅप आहे, हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे. ही सर्व गोष्टींची सुरुवात झाली त्याची रसद पुरवली गेली त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. की या सर्व गोष्टी पुन्हा बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्यावारी खूपली असे अनेकजण होते. त्या सर्वांनी सर्वगोष्टी मिळून सर्व आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला.मी खरंतर अयोध्येला जाणार. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच.असं राज ठाकरेंनी सभेत आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं.