राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी !

117 0

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी अवघ्या 22 सेकंदातच अभिभाषण आटोपतं घेतलं.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोषणाबाजीमुळे संबोधित करणे कठीण झाल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी संबोधन आटोपते घेऊन विधिमंडळाचे सभागृह सोडले. दरम्यान राज्यपालांनी सभागृह सोडल्यानंतर या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदार आक्रमक झाले आहेत. सभागृहातील घोषणाबाजी नंतर सभागृह सोडणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असून, “राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव”अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात आली. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्र आणि घटनेचा अपमान केला आहे असा आरोप सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.

Share This News

Related Post

पुणे : कालवे सल्लागार समिती बैठका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

Posted by - November 25, 2022 0
पुणे : कालव्यांच्या शेजारील विहिरींना पाणीपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा…
Raj Thackeray

Raj Thackeray : अजित पवारांच्या बंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

#CYBER CRIME : रिफंडचा संदेश आला आहे ? प्राप्तीकराशी निगडीत कोणताही संदेश येत असेल तर सावध

Posted by - February 18, 2023 0
वाढत्या डिजिटल उपयोगामुळे फसवणूकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत. हॅकर आता प्राप्तीकर खात्याच्या नावावर रिफंडचा खोटा एसएमएस किंवा मेल पाठवून ग्राहकांच्या…

गृहिणींसाठी आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात प्रती लीटर 20 रुपयांची कपात

Posted by - June 17, 2022 0
नवी दिल्ली- वाढत्या महागाईच्या दरात सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्यात…

संत सोपानकाका पालखी मार्ग केंद्राकडे वर्ग करा – विजय शिवतारे

Posted by - April 4, 2022 0
संत सोपानकाका पालखी मार्गाचे काम भरपूर दिवसापासून रखडले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मार्गाचे भूमिपूजन केले होते तरी इथला रस्ता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *