मुंबई : पावसानं महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भामध्ये यावर्षी सर्वात जास्त थैमान घातले आहे . महाराष्ट्राच्या या भागातील शेतकऱ्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे.
राज्यात सुमारे १० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाला आहे . तर मराठवाडा विभागात ४ लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालो आहे. खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याकारणाने पीक नुकसानीसह सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल विभागीय प्रशासनानं तयार केला आहे .
पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप देखील सुरू असून ,यामध्ये १ लाख २० हजार 271 हेक्टर वरील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत . 46 जणांनी आपला जीव गमावला असून , 660 जनावरे दगावली आहेत . मालमत्ता नुकसानीमध्ये मराठवाड्यात 1,573 घरांची पडझड झाली आहे. सर्व अहवाल विभागीय प्रशासनाने तयार केला असून , आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करणार याकडेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.