नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने देशांतर्गत महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यातशुल्क (Onion Export Duty) 40 टक्क्यांपर्यंत वाढवल्याने राज्यातील (Onion Export Duty) राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे.40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द व्हावे, यासाठी शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. यंदाच्या कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 50 टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याने निर्यातशुल्काचा सर्वाधिक फटका राज्याला बसणार आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला.
केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे…— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) August 22, 2023
कांद्याचा मुद्दा आणखी चिघळला तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचा अंदाज आल्यानंतर राज्य सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी थेट दिल्ली गाठली. याठिकाणी मुंडे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये कांद्यावरील 40 टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली.
राज्यातील कांदा प्रश्नी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री.पियुष गोयल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी केंद्र सरकार नाफेड मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. @PiyushGoyal pic.twitter.com/fifx54tKA2
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 22, 2023
या बैठकीमध्ये केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.