नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. निफाड तालुक्यातील नांदुर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पन्नास हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पात्रात करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहे.
निफाड सिन्नर रस्त्यावर असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले आहे. पुराचे पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढली आहे आणि नदीचा पुल पाण्याखाली गेला आहे मात्र वाहनचालक पुलावरून जाण्याचे धाडस करताना दिसत आहे.