औरंगाबाद : क्रांती दिनानिमित्ताने औरंगाबाद शहरातील भारत माता मंदिरात शंभरहून अधिक क्रांतिकारकांच्या फोटोंसहीत त्यांची ऐतिहासिक माहिती दर्शवण्यात आली होती. भारत माता मंदिर हे एकमेव मंदिर आहे ज्यात क्रांतिवीरांची माहिती लावण्यात आली आहे.
क्रांतीवीरांचा इतिहास नवीन पिढीला माहिती व्हावा यासाठी या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. क्रांती दिनानिमित्ताने भारत माता मंदिरांमध्ये दरवर्षी पूजन केलं जातं. यावर्षीही पूजन करण्यात आलं.