जालना : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. अशातच जालन्यात जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. उपोषणाचा सातवा दिवस असून आंदोलनाकांनी सराकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी आंदोलकांशी सुमारे 15 मिनिटे चर्चा केली. यावेळी राज ठाकरे नेमके काय म्हणाले चला पाहूया….
![Raj Thackeray](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2023/09/Raj-Thackeray-1024x579.jpg)