छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आज राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मात्र या अधिवेशनापूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला आहे. या अधिवेशनात सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी सुरुवातीलाच करावी नंतर मागासवर्गीय आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
या अधिवेशनात सगे सोयरे कायद्याची अंबलबाजवनी सुरुवातीलाच करावी नंतर मागासवर्गीय आयोगाचा विषय चर्चेला घ्यावा ही विनंती आहे. सरकारने सगेसोयरे विषय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. मराठा आमदार मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा. आम्हाला ओबीसी आरक्षणच पाहिजे. सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, आरक्षण कोणते पाहिजे. त्यामुळे ओबीसीमधून आरक्षणाची बाजू लावून धरावी. जर त्यांनी असे केले नाही तर त्यांना मराठा विरोधी धरल्या जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,शिष्टमंडळ आले नाही, प्रत्येक जण त्यांच्या सोयीने येतात. आता त्यांचे देव देव सुरू आहे. त्यांच्याकडे जनतेचा आक्रोश ऐकायला देखील वेळ नाही. आता ही सरकारला शेवटची संधी, आरक्षण नाही दिलं तर पश्चतापाची वेळ येईल, त्यांना पश्चताप शब्दाची व्याख्या बदलावी लागेल. सगेसोयरेची अंमलबजावणी हाच पर्याय आरक्षण आज नाही दिले तर उद्या आंदोलन घोषीत करू, असा इशारा मनोज जरांगे पाटलांकडून देण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shivneri Bus : शिवनेरी बस उद्यापासून ‘अटल सेतू’ वरुन धावणार
NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश
Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त
Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात
Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?
Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी