नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी पहाटे मराठा समाजाची पदयात्रा पोहचली. नवी मुंबईत दाखल होताच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचे समोर आले.
काय घडले नेमके?
पदयात्रेमुळे मनोज जरांगे यांच्या पायाला सूज आली असून सकाळपासूनच त्यांना ताप भरला आहे. त्यामुळे जरांगे यांची माथाडी भवन येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. सध्या जरांगे हे हे एपीएमसी मार्केटमधील प्रशासकीय इमारतीमध्ये आराम करीत आहेत.
यादरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला आले आहेत. जर हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची समजूत काढण्यात अयशस्वी ठरले तर मराठा क्रांती मोर्चा थेट आझाद मैदानावर धडकणार आहे. मराठा आरक्षण घेणारच अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. ध्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव नवी मुंबईत दाखल होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Chandrapur Crime : चंद्रपूर हादरलं ! ठाकरेंच्या कट्टर युवासेना शहर प्रमुखाची निर्घृणपणे हत्या
CIDCO : गुडन्यूज! सिडकोकडून ‘एवढ्या’ घरांसाठी लॉटरी जाहीर
Republic Day 2024 : मुंबईतील वाहतुकीत बदल; ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद