जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी अंतरवाली सराटीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांना माझा बळी घ्यायचा आहे. मी मुंबईत सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्यायचाय ना तुम्हाला घ्या, असे म्हणत जरांगे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मी सागर बंगल्यावर येतो घाला मला गोळ्या, असे जरांगे म्हणाले आहेत.
जरांगेनी काय केले आरोप?
सरकारने दिलंय 10 टक्के आरक्षण. आपण मागतोय मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण. हे आरक्षण सिद्ध झालं आहे. हे सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे हेही सिद्ध झालं आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सग्यासोयऱ्यांचा कायदा करा, अशी आपली मागणी आहे. सरकारने आणि आपण मिळून हे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे, असे ते म्हणाले.
हे सगळं जे कोण करतंय, त्या मागे एकटा देवेंद्र फडणवीस आहे. मला घेरण्यात आलं आहे. यात एकनाथ शिंदे यांचेही दोन चार लोक आहेत. अजितदादांचेही दोन आमदार आहेत. सग्यासोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि 10 टक्के आरक्षण काही करून मराठ्यांवर लादायचा प्रयत्न सुरू आहे. हे ऐकतच (मनोज जरांगे ) नाही. यामुळे एकतर हे संपलं पाहिजे. नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. त्याला बदनाम तरी करावं लागेल. सलाईनमधून विष देऊन का होईना संपवावं लागेल. किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीसाना वाटतंय.देवेंद्र फडणवीसला सांगतो, बैठक संपल्यावर मी सागर बंल्यावर येतो, मला मारून टाका. तुला माझा बळी घ्यायचा आहे ना, माझा बळी पाहिजे ना. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घे माझा बळी. मी समाजाशी असलेली इमानदारी नाही मोडू शकत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sangli Accident : पोलीस होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं ! सरावासाठी जाताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद
Kumar Shahani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचं निधन
WPL 2024 : शोभना आशाने 5 विकेट्स घेऊन रचला इतिहास
Weather Update : पुढील 3 दिवसांत राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा