मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पण वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी (Manisha kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.शिवसेनेच्या पूर्वसंध्येला शिशिर शिंदे (Shishir Shinde) आणि आमदार मनिषा कायंदे (Manisha kayande) यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्यामुळे हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काय म्हणाल्या मनिषा कायंदे?
यावेळी मनिषा कायंदे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, गेल्या एक वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जो कामाचा झपाटा लावला आहे.त्यामुळे आज मी ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांवर फक्त दोषारोप करणे पण लोक का पक्ष सोडून जात आहेत याचे आत्मपरीक्षण न करणे अशी अनेक कारणे आहेत म्हणत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.
मनिषा कायंदेंवर एकनाथ शिंदेंनी सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी
एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांची शिवसेना पक्षाच्या सचिव आणि प्रवक्तेपदी निवड केली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या महिलेवर सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायंदे यांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा
मनिषा कायंदे यांची कारकीर्द
लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे (Manisha kayande) यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात केली आहे. लहानपणी त्या वडिलांसोबत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जायच्या. त्यांचे वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरवायचे. त्यामध्ये त्या आपल्या वडिलांना मदत करत होत्या. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी (Manisha Kaynade) भाजपमध्ये काम केलं. 2012 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांना शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. नंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेचे तिकीट दिले. विधान परिषदेवर जाणं हा आपल्या राजकीय प्रवासातील मोठा टर्निंग पॉइंट ठरला होता.