Akshay Gavte

Buldana News : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण

1338 0

बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे. तो बुलढाणा (Buldana News) तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवाशी होता.अक्षयच्या दु:खद निधनामुळे संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना अक्षय यांना वीरमरण आले. 20 ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय याच्यावर सोमवारी 23 ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी अक्षय “अग्निवीर”म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये ते कर्तव्यावर होते जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार प्रकृती अवस्थामुळेच त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने रात्री त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गेल्या वर्षी त्यांची अग्निवीर मध्ये भरती झाली अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अक्षय यांना एक लहान बहिण अक्षय यांचे आई वडील शेती करतात अक्षय यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे. अक्षय गवते यांचे पार्थिव विमानाने चंदीगड, दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे.

Share This News

Related Post

pune crime

पुण्यात फेरीवाल्यांची अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला अन् कर्मचाऱ्याला मारहाण

Posted by - May 16, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर (Dhole Patil Road) अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला…

भूमिहीनांच्या डोक्यावर टांगती तलवार आणि गायरानात मंत्र्यांची चराई! दुर्बल अतिक्रमातांना मात्र नोटिसा हा निर्लज्जपणाच – आप

Posted by - December 27, 2022 0
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या आधारे आणि २०२२मधील हायकोर्टाच्या आदेशानुसार मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने गायरानांवरील सर्व अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या होत्या. स्थानिक लोकांच्या विरोधानंतर…
Weather Update

Maharashtra Weather Update : कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट

Posted by - May 23, 2024 0
मुंबई : कोकणात मान्सून पूर्व पावसाने (Maharashtra Weather Update) जोर धरला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.…

RAJ THACKREY : “शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने…!”, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे . याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे…

मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा, आकाश अंबानी यांना संधी

Posted by - June 28, 2022 0
मुंबई- आशियातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *