मुंबई : महाराष्ट्रात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात तापमानात मोठी वाढ होणार असून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. रायगडसोबत रत्नागिरी, सांगली, सोलापूरमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ भागांमध्ये असेल उष्णतेची लाट
पुढील 24 तासात महाराष्ट्र आणि गोवा राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील हवामान कोरडे राहणार आहे. कोकणात काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता
विदर्भा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आले आहे. तसेच काही भागात गारपिटी होण्याचीही शक्यता असून भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या
Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने