जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते, चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिसचार्ज मिळाला. त्यानंतर ते शुक्रवारी पुन्हा अतंरवाली सराटीमध्ये पोहोचले. मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची तब्येत खालावली. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्यानं अंतरवाली सराटीमध्ये डॉक्टरांच्या पथकाला तातडीने पाचारण करण्यात आले. आता त्यांची तब्येत बरी असल्याचे समोर आले आहे.
डॉक्टरांनी सलाईन लावून उपचार केल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सध्या त्यांची तब्येत बरी असून डॉक्टरांनी त्यांचा ईसीजी काढला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. चार दिवसांच्या उपचारानंतर ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आले , मात्र त्यानंतर मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक खालावली. अंतरवालीमध्येच त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा