मुंबई : 30 मेला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर आता हवामान विभागाकडून (Monsoon Update) मान्सूनबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. मान्सूननं आपला केरळमधील मुक्काम पुढे हलवला आहे. रविवारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा काही भाग व्यापून पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, तापमानात घट होऊन उष्णतेपासून दिलासा मिळेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार मान्सून पूर्व पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असून, सहा जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होईल त्यानंतर तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. दिलासादायक बातमी म्हणजे यंदा सरसरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, यंदा सरासरीच्या 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हंटल आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू