सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा आता आई-वडिलांच्या स्थावर मालमत्तेत वारस नोंद न करण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीने घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर असा निर्णय घेणारी नरवाड ग्रामपंचायत ही सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानेवारी रोजी गावची ग्रामसभा पार पडली.ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या ग्रामसभेमध्ये नरवाड गावाने एकमताने ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष 140 आणि ऑनलाईन द्वारे 365 गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली होती.आणि गावाने एक मुखाने हा प्रस्ताव मंजूर केला.
गावात राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना आता त्यांच्या स्थावर संपत्तीच्या वारसा नोंद मधून बेदखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ग्रामसभेत या ठरावाला मान्यता देत, एक मताने सर्वच गावकऱ्यांनी याला मंजुरी दिली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Buldana Accident : नेमकी चूक कोणाची? भरधाव दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात
Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती
Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका
Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक