पुणे: राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांचा हा पुणे दौरा सोशल मीडियावर चेष्टेचा विषय बनला होता.
या दौऱ्यात केवळ घर ते कार्यालय आणि सोईनुसार राखीव असा हा दौरा आल्यानंतर विरोधकांनी देखील मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीकेची जोड उठवली होती त्यानंतर आता तानाजी सावंत यांनी यासंदर्भात आपले भूमिका मांडली असेल सावंत म्हणतात दि. २७, २८ रोजी माझा वेळ पुणे येथील कार्यालयांमध्ये राखीव ठेवलेला असल्याकारणाने प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल निरनिराळी चर्चा पाहायला मिळाली… बालाजी नगर व कात्रज येथील कार्यालयातूनच आजवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्यात आला, याच कार्यालयातून पूरग्रस्तांसाठी भरभरून मदत पाठवण्यात आले, याच १०×१० च्या खोलीतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीचं रोपटं लावण्यात आलं आज त्याचं रूपांतर वटवृक्षात होतं आहे, याच कार्यालयातून स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला गेला, सोमनाथ नाईक च्या उपचारासाठी मदत झाली, याच कार्यालयातून स्व. दिलीप जावळे यांच्या कुटुंबाला मदत झाली, कोविड काळामध्ये देखील एकही दिवस घरामध्ये न बसता रोज नागरिकांसाठी मदत पोहचवली मग त्या मध्ये औषध इंजेक्शन पासून ते ऑक्सिजन सिलेंडर व ड्युरा सिलेंडर पर्यंत मदत देऊ केली… अशी कित्येक कामे या कार्यालयातून झाली आहेत.
पुढे सावंत म्हणाले परमेश्वर कृपेने आजवर मी अनेकांच्या मदतीला पोहचू शकलो कारण घरातून कार्यालयाकडे गेल्यामुळेच…
यापुढे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सन्मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अडलेल्या, नडलेल्या आणि अठरा विश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या गरिबांच कल्याण होणार म्हणजे होणार आणि यासाठी ही कार्यालये मध्यवर्ती असतील.
शेवटी सुरेश भट यांच्या शब्दातून हेच सांगेल,
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो आहे..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही ….
तानाजी सावंत यांचे स्पष्टीकरण खालील लिंकवर