RBI

RBI कडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

4550 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) वेळोवेळी देशातील इतर बँका आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवलं जातं. याच आरबीआयने एका बँकेवर सक्त कारवाई करत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला गेली असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. किंबहुना बँक सध्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम त्यांना परताव्याच्या स्वरुपात देण्यास असमर्थ असल्याचंदेखील बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘या’ बॅंकेचा परवाना रद्द
आर्थिकदृष्ट्या ठेवीदारांची रक्कम परत करण्यास असमर्थ असणारी महाराष्ट्रातील ही संस्था म्हणजे जय प्रकाश नारायण नगरी सहकारी बँक बसमथनगर. 6 फेब्रुवारी 2024 रोजीच रिझर्व्ह बँकेकडून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

ग्राहकांना किती रक्कम मिळणार परत?
रिझर्व्ह बँकेच्या वतीनं महाराष्ट्रातील कमिश्नर फॉर कोऑपरेशन एंड रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव सोसायटीजला यासंदर्भातील निर्देश दिले असून जय प्रकाश नारायण नगरी सहकारी बँक बसमथनगर बंद करून एक लिक्विडेटर नियुक्त करण्यास सांगितलं आहे. लिक्विडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खातेधारकांना डिपॉझिट इंश्योरेंस क्लेमच्या माध्यमातून त्यांची रक्कम दिली जाणार आहे. इथं 5 लाखांपर्यंतची रक्कम खातेधारकांना मिळणार असून, ही रक्कम डिपॉझिट इंश्योरेंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) च्या वतीनं देण्यात येणार आहे. बँकेवर करण्यात आलेल्या कारवाईमुळं एका अर्थी खातेधारकांना सुरक्षिततेची हमीच देण्यात आली आहे. या बँकेच्या तपशीलामध्ये नोंद असल्यानुसार साधारण 99.78 टक्के खातेधारकांना त्यांची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग; 19 जण थोडक्यात वाचले

Share This News

Related Post

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी : मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर 27 तासांचा मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे बातमी आहे लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी करणार पूल पाडण्याबरोबरच कोपरी पुलाच्या कामकाजासाठी लोकलच्या फेऱ्यांमध्ये…

महत्वाची बातमी : विशाखापट्टणम आंध्र प्रदेशची नवी राजधानी होणार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची घोषणा

Posted by - January 31, 2023 0
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशच्या राजधानीबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी विशाखापट्टनम हि आंध्र प्रदेशची राजधानी…
PM Kisan

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता

Posted by - June 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan…
Nagpur News

Nagpur News : भाजपतर्फे कामगारांसाठी आयोजित शिबीरामध्ये मोठा गोंधळ

Posted by - March 9, 2024 0
नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात मोठा गोंधळ झाला.…

BIG NEWS : शेगावमध्ये राहुल गांधींच्या ताफ्याला मनसैनिकांनी दाखवले काळे झेंडे

Posted by - November 18, 2022 0
शेगाव : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही शेगाव मध्ये पोहोचली आहे. शेगावमध्ये त्यांची महाराष्ट्रातली दुसरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *