काही पदार्थ आपण जवळजवळ दररोज खात असतो, जसे की कोशिंबीर. मात्र आयुर्वेदात काही पदार्थ जड मानले आहेत. म्हणजेच त्यांचे दररोज सेवन करू नये. यानुसार आज तुम्ही जे अन्न खात आहात ते एकतर तुमच्यासाठी औषधाचे काम करेल किंवा हळूहळू शरीरात विष पसरवेल. त्यामुळे निरोगी शरीर हवं असेल तर या गोष्टी रोज खायला घेऊ नयेत. कोणत्याही पदार्थाचे सेवन प्रमाणातच करावे.
बीन्स
ही भाजी बऱ्याच जणांना आवडते, पण पोटाला पचायला जड असते आणि त्याचबरोबर वात, पित्त दोन्ही वाढवते. तसेच हे शुक्राणूंच्या आरोग्यासाठी चांगले नाही आणि रक्तस्त्राव विकारांसाठी देखील चांगले नाही.
लाल मांस
बीफ, पोर्क आणि लॅम्ब पचायला खूप जाड असतात. हे पदार्थ खाल्लेच तर दुपारीच करा. परंतु पचनशक्ती कमी असणाऱ्यांनी मात्र या मांसाचे सेवन करने टाळावेच.
मुळा
मुळा खरंतर शरीरासाठी खूप चांगला आहे. परंतु उष्ण प्रकृती असेंन तर सेवन टाळावे. तसेच थायरॉईड चा त्रास असें तर मुळा टाळा टाळावेच