उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग येणे, त्वचेला खाज येणे असे त्रास होऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान वाढत असल्याने शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल बिघडल्याने देखील त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःची काळजी जाणून घ्या
* आहारात जास्तीत जास्त प्रमाणावर फळे खावी त्यात पाण्याचा अंश जास्त असतो. फळे, फळांचा रस, ताक, भाज्यांचा रस, सूप इत्यादी पदार्थांचा समावेश अधिक प्रमाणात करावा.
* सकाळचा नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण याव्यतिरिक्त दर दोन ते तीन तासांनी नाश्ता म्हणून फळे खावीत यामुळे शरीरातील उष्णता आणि आम्लपित्त कमी करण्यास मदत होते.
* नाश्त्यामध्ये सर्वात प्रथम फळे आणि नंतर प्रथिने असलेल्या अन्नपदार्थांचा समावेश व्हायला हवा. दोन्ही वेळच्या जेवणात चौरस आहार असायला हवा चपाती, भाजी, डाळ, कोशिंबीर हे सर्व पदार्थ ताटात असावेत.
* उन्हाळ्यात पापड, भजी असे तेलकट पदार्थ शक्यतो घेऊ नये. सोबत दोन चार खजुर ठेवावेत त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते.
* उन्हाळ्यात थोडासा व्यायाम करावा,अनेकदा उन्हाळा वाढला म्हणून व्यायामाला सुट्टी देतात तसे न करता जर उन्हाचा त्रास होत असेल तर घरातल्या घरात व्यायाम करावा यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
* उन्हात घराबाहेर जाताना त्रास होऊ नये म्हणून चेहरा आणि डोकं झाकण्यासाठी टोपी, स्काफ,छत्रीचा वापर करावा.