यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये डोळे येण्याच्या (Eye Irritation) प्रमाणात वाढ झाली आहे. ह्यामध्ये डोळ्यातील (Eye Irritation) पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत पृष्ठभागाला आच्छादणाऱ्या कंजक्टिव्हा ह्या पातळ पडद्यावर दाह निर्माण होतो. हा प्रादुर्भाव समुदायातील अन्य व्यक्तींमध्ये वेगाने पसरू शकतो. त्यामुळे जागरूकता व प्रतिकाराचे उपाय त्वरित करण्याची गरज भासते. धक्कादायक म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत कंजंक्टिव्हायटिसच्या प्रमाणात चिंताजनक म्हणजेच 10.15% वाढ झाली आहे.
हा आजार (Eye Irritation) खूप गंभीर स्वरुपाचा समजला जात नाही. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर त्याचा परिणाम होत असल्याने आणि तो बरा व्हायला बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणं योग्य ठरतं. डोळे येणे म्हणजे काय? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणं काय? त्यावर उपचार कोणते? आणि त्यापासून बचाव कसा करायचा, हे आपण जाणून घेऊया.
डोळे येणे म्हणजे काय?
खरं तर हा आजार एक प्रकारचं संसर्ग किंवा अॅलर्जी आहे. ज्या व्हायरसमुळे सहसा आपल्याला सर्दी होते, त्या व्हायरसमुळे हा आजार संभवतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, तर अॅलर्जीमुळे डोळे आलेले असल्यास त्याचा दुसऱ्यांना संसर्ग होत नाही.
डोळे येण्याची लक्षणं काय आहेत?
डोळे हलके लाल होऊ लागतात.
डोळ्यातून पाणी यायला लागतं.
खाज येऊ लागते.
डोळ्यात थोडी चिकटपणा येतो.
डोळ्यात वारंवार खाज येते.
तज्ज्ञ सांगतात की, कधीकधी यासोबत सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणेही जाणवू शकतात.
संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
डॉक्टर सांगतात की, कोणताही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.
संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल वापरणं टाळावं.
हात स्वच्छ धुवावेत.
डोळ्यांना सारखा हात लावू नये.