मागील दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.
दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिहीण्याचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती, दरम्यान कुलगुरूंच्या बैठकीत विद्यार्थ्यांना प्रति तास १५ मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च तंत्रज्ञज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत यानी ट्विट करत सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला. pic.twitter.com/lIzcBhXJ7a
— Uday Samant (@samant_uday) April 13, 2022