मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून महाविद्यालयाकडून बंद करण्यात आलेला ६०-४० गुणांचा पॅटर्न पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. मुंबई-विद्यापिठाने नवीन शैक्षणिक वर्षापासून हा पेपर पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत होणार आहे.
अंतर्गत मूल्यमापनाचा गैरप्रकार याआधी साल २०११ -२०१२ मध्ये मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापन ६० -४० चा पॅटर्न लागू करण्यात आला होता. मात्र, अंतर्गत मूल्यमापनात काही ठिकाणी गैरप्रकार उघड झाल्यामुळे बी.कॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल थेट ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्या कारणामुळे पुढे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून ६० -४० चा पॅटर्न पूर्णता बंद करण्यात आला होता.
त्यानंतर सेल्फ फायनान्स आणि एलएलबीच्या विद्यार्थ्यांनाच हा पॅटर्न लागू करण्यात आला होता. त्याव्यतीरिक्त अन्य अभ्यासक्रमासाठी १०० मार्कांची परिक्षा घेण्यात येत होती. मात्र अश्यातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. या अभ्यासक्रमांकरिता पुन्हा एकदा ६०-४० चा पॅटर्न लागू करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाने याबाबत एक परिपत्रक जारी करत वार्षिक लेखी परीक्षा ६० गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन ४० गुणांचे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही स्वायतत्ता मिळवलेल्या महाविद्यालयांमध्ये हा पॅटर्न आधीपासूनच सुरू आहे. अंतर्गत मूल्यमापनाच जास्त गुण आल्याने आता विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती अधिक वाढण्याची अंदाज वर्तवण्यात येत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Loksabha : भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन
Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी
Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क
Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन
Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला