कोल्हापूर : शिक्षकांसाठी (Teacher Recruitment) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यामध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा करत राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती (Teacher Recruitment) असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही असं केसरकर म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले केसरकर?
राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) केली जाणार असल्याची मोठी घोषणा दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षक भरती असणार आहे. केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याचबरोबर राज्यातील शिक्षकांच्या सगळ्या बदल्या रद्द केल्याचेदेखील दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे.
शालेय गणवेशावर दिली ‘ही’ प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत बोलताना केसरकर यांनी म्हटलं की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचं वाटप करण्यात यावं, नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेवशावाचून एकही विद्यार्थी रहाता कामा नये, अशा सूचनादेखील दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत.