यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये महाशिवरात्रीच्या यात्रेवरुन घरी परतताना वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीत शुक्रवार 8 मार्चच्या सायंकाळच्या सुमारास घडली. संकेत पुंडलिक नगराळे (वय 27), अनिरुद्ध चाफले (वय 22) आणि हर्ष चाफले (वय 16) अशी वर्धा नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे असून नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
वणीच्या विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी असलेला संकेत, अनिरुद्ध आणि हर्ष हे तिघे भावंड महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रेला गेले होते. दरम्यान, यात्रेतून घरी परतत असताना वाटेत लागणाऱ्या पाटाळा येथील वर्धा नदीत पोहण्याचा त्यांना मोह झाला. त्या नंतर यातील एकाने नदी पात्रात उडी घेतली मात्र त्याला पाण्याचा अंदाज नाही आला आणि तो बुडू लागला हे पाहून बाकी दोघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू
Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
Latur Accident : भरधाव कार हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांचा मृत्यू; Video आला समोर
Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय
Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा
Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल
Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक