छत्रपती संभाजीनगर : काही वेळा व्यक्ती रागाच्या भरात असे काही बोलून जातो कि ते बोलणे समोरच्या व्यक्तीच्या जिव्हारी लागते. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. यामध्ये आपल्या पतीचे बोलणे जिव्हारी लागल्याने पत्नीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
निकिता लखन माळी ( वय 21) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील रहिवाशी होती. मंगळवारी रात्री हि घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लखन भगवान माळी ( वय 24 ) असे पतीचे नाव आहे.
आरोपी भगवानवर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा. मला दुसरं लग्न करायचं आहे, असं म्हणून लखन निकिता हिला वारंवार त्रास देत होता.या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या बाबतीत निकीताचे वडील इंदास सोनवणे (रा. खरज) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.