वर्धा : राज्यात अपघातांचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेईना. रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. सध्या अशीच एक अपघाताची घटना वर्ध्यामधून (Wardha Accident) समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. कार आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
केळझर येथील दाम्पत्य गावी परत जात असताना कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा रूग्णालयात मृत्यू झाला. काल दुपारी दीडच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्न करत असताना भरधाव कारनं दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.अवधूत वैरागडे (वय 60वर्ष) व चित्रा वैरागडे (वय 55 वर्ष) अशी या अपघातात मृत पावलेल्या पती – पत्नीचे नाव आहे.
ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अवधूत यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी चित्रा यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दाम्पत्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा
Dr. Vinayak Kale : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती
Sanjay Raut : राज्यात नामर्दांचं सरकार, गद्दारांसाठी वेगळा कायदा; संजय राऊत यांची सरकारवर टीका
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी घातला टीपू सुलतानच्या फोटोला हार; Video व्हायरल