उल्हासनगर : राज्यात अपघाताचे (Ulhasnagar Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघातातच 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातील उल्हासनगरमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला आहे. उल्हासनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत.
भरधाव कारने रिक्षा आणि इतर गाड्यांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. कारचालक हा मध्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती मिळत आहे. उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेनंतर कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. या अपघाताप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये
Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल
Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश
Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर